Posts

Showing posts from 2009

कशामुळे "नो पॉलिटिक्‍स?'

राजकारण, समाजकारण हे समाजाचे अविभाज्य घटक आहेत, हे तरुण वर्ग विसरला आहे. कॉलेज कॅम्पसपासून ते आयटी कंपनीतील तरुण राजकारणाच्या विषयालाच बगल देत आहे. सर्वाधिक तरुण लोकसंख्या असणारा देश म्हणून आपल्या देशाची ओळख होऊ लागली आहे. स्वातंत्र्य चळवळीपासून आतापर्यंत इतिहासाच्या प्रत्येक कालखंडात देशातील तरुणांनी झोकून देऊन योगदान दिले आहे. स्वातंत्र्य चळवळीत अनेक तरुणांनी प्राणाचे बलिदान दिले, तर कित्येकांनी तुरुंगवास भोगला. त्यानंतरच्या नेहरू-शास्त्रीजी यांच्या काळातही तरुण राजकारणात सक्रिय होते. जयप्रकाश नारायणांच्या चळवळींना खऱ्या अर्थाने व्यापक स्वरूप देण्याचे काम तरुणांनीच केले. आज सत्तेवर दिसणारी बहुतेक नेतेमंडळी याच चळवळीतून तयार झाली आहेत. काळ बदलला; जागतिकीकरणाच्या शिरकाव झाला आणि देशातील तरुण अधिक "करिअर ओरिएंटेड' झाला. त्यांच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या, त्यांच्या समोरील संधी वाढल्या. ही झाली चांगली बाब. यातून या तरुणाबरोबरच देशाचाही विकास होत गेला. ... स्थळ ः एके छोटी सॉफ्टवेअर कंपनी वेळ ः गुरुवारची दुपार... "लोडशेडिंग'मुळे वीज जाऊन बराच वेळ झालेला. या काळात कंपनीचा ब...